प्रतिनिधी : सध्या पिंपरी सांडस परिसरातील बुर्केगाव न्हावी सांडस मेमाणवाडी आष्टापूर या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढला असून शेती काम करणे कठीण झाले आहे .बिबट्याचा होणारा रात्रीचा हल्ला हा शेळ्या, मेंढ्या ,छोटी जनवारे यांच्या वरती होत असून शेतकऱ्याचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या परिसरात रात्रीचे फिरणे कठीण होत चालले आहे सध्या परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी येणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्याला रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे .त्यामुळे बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे .यावरती वेळोवेळी परिसरातील ग्रामपंचायतीने वन अधिकारी पुणे यांना पत्रव्यवहार करून सुद्धा त्याबाबत पिंजरा लावण्याचा मात्र पर्यायी व्यवस्था निवडली जात नाही. म्हणून बिबट्या जोमात शेतकरी कोमात अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळे या परिसरातून सर्व ग्रामस्थांची मागणी होत आहे की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा .
Related Articles
Check Also
Close